अजित पवार, मिंधे गट हे फक्त बुडबुडे; संजय राऊत यांचा घणाघात

अजित पवार, मिंधे गट हे फक्त बुडबुडे; संजय राऊत यांचा घणाघात

अजित पवार आणि शिंदे यांचे पक्ष नसून ते गट आहे,हे जनतेने निवडणुकीतून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता निकालानंतर त्यांच्या गटात अस्वस्थता आहे. ती आता स्पष्ट होत आहे. तसेच हे गट म्हणजे अळवावरचे पाणी फक्त बुडबुडे आहेत. पावसाळ्यात उगवणाऱ्या या छत्र्या भविष्यात नष्ट होतील, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांनी अजित पवार गट आणि मिंधे यांची सालटी सोलली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील जो पक्ष आहे, तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हे जनतेने सिद्ध केले आहे. त्यामुळे जे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणवतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. तसेच ज्यांना अमित शहा यांनी धनुष्यबाण दिले आहे, ती खरी शिवसेना नाही. तसेच अमित शहा यांनी ज्यांना घड्याळ दिले आहे, ते खरे पक्ष नाही, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असेही त्यांनी ठकाणवून सांगितले.

पैसे आणि यंत्रणेच्या जोरावर त्यांनी काही जागा मिळवल्या असतील. मात्र, त्यांच्यातच अस्वस्थता आहे. स्वतःला पक्ष म्हणवणारे अळवावरचे पाणी फक्त बुडबुडे आहेत. पावसाळ्यात बेडूक येतात, पावसाळ्यानंतर निघून जातात. सध्या त्यांचा पावसाळा सुरू आहे. खरे तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वःतची मते नाहीत. त्यांना जी मते मिळाली आहेत, ती भाजपची आहेत. शिंदे यांनी तीन ते चार लाख मते विकत घेतली, तसेच भाजपची मते त्यांना मिळाली, त्यामुळे त्यांचे दोनचारजण निवडून आले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

अजित पवार आणि शिंदे हे फक्त गट आहेत. त्यांना पक्ष म्हणून जनता कधीच मान्यता देणार नाही. त्यांनी ज्या जागा मिळवल्या आहेत, त्या मते विकत घेत जिंकल्या आहेत. त्यांनी विजय विकत घेतला आहे. जनता त्यांच्या पाठिशी नाही, हे स्पष्ट झाले आहे. हे गट म्हणजे पावसाळ्यात उगवलेल्या छत्र्या आहेत, त्या भविष्यात नष्ट होणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी सोडून त्यांच्यासोबत गेलेल्यांची अस्वस्थता निकालानंतर स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले.

काहीजण अल्पसंख्याकांचे राजकारण करत आहेत, मात्र अल्पसंख्याक मतावर निवडणुका जिंकता येत नाही. ती त्यांची मजबुरी असेल, तो त्यांचा प्रश्न आहे. छगन भुजबळसोबत असते, तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा टिळा लागला असता. आता त्यांच्यात अस्वस्थता आहे. अजित पवार आणि शिंदे गटातील अनेकांची अस्वस्थता स्पष्ट दिसत असून अनेकजण बाहेर पडण्याच्या आणि इतर पक्षांचा संपर्कात आहेत. मात्र, योग्य वेळ आल्यावर ते सर्वांसोमर येईल, अशा गोष्टी बंद दाराआड होतात, असे सांगत त्यांनी यावर आता बोलणार नाही. योग्य वेळ आल्यावर जनतेला सर्व समजेल, असे संकेतही दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;