एक छोटीशी गडबड अन् मोदी सरकार धडाम… ; राहुल गांधी यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

एक छोटीशी गडबड अन् मोदी सरकार धडाम… ; राहुल गांधी यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रथमच मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल गांधी यांनी एक मोठा दावा केला आहे. तसेच एक जरी गडबड झाली तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कोसळू शकते, अशी स्थिती असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत न मिळाल्याने एनडीएमधील मित्रपक्षांच्या टेकूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उभे आहे. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे. मोदींचा प्रतीमा नष्ट झाली आहे. मोदी विचारधाराही संपली आहे. भाजपचा मूळ पाया आणि धार्मिक द्वेष पसरवण्याची त्यांची विचारधारा डळमळीत झाली आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.

नरेंद्र मोदी यांच्यासमोर सरकार टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. या निवडणुकीतील अनपेक्षित निकालाने हिंदुस्थानच्या राजकारणात एक मोठा बदल झाला आहे. आणि पंतप्रधान मोदींना आपले सरकार टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

‘मोदींच्या गटात असंतोष’

निवडणुकीचे निकाल पाहता स्थिती नाजूक बनली आहे. छोटीशी गडबड झाली तरी सरकार कोसळू शकते. सरकारमधील एका मित्रपक्षाने जरी भूमिका बदलली तरी सरकार पडेल. मोदींच्या गटात प्रचंड असंतोष आहे. त्यातील अनेकजण आपल्या संपर्कात आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. पण ते कोण आहेत? याची माहिती राहुल गांधी यांनी उघड केली नाही. फायनॅन्शियल टाइम्स दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी हा दावा केला आहे.

द्वेष पसरवायचा, भावना भडकवायच्या आणि त्यातून आपला राजकीय हेतू साध्य करायचा, अशी त्यांची विचारधारा आहे. मात्र, हिंदुस्थानच्या नागरिकांनी ही विचारधारा फेटाळली. यामुळे यावेळी सत्ताधारी आघाडीला सरकार टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कारण 2014 आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या जे कामी आले ते यावेळी कामी आले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ‘इंडिया’ आघाडी एकजुटीने निवडणूक लढली आणि जनतेने आम्हाला साथ दिली, असे राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;