अनधिकृत स्टॉलवर होणार कारवाई; चायनीज, वडापाव विक्रेते पालिकेच्या रडारवर
पावसाळी आजारांना रोखण्यासाठी पालिका सज्ज झाली असताना आता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱया रस्त्यावरच्या अनधिकृत चायनीज, वडापाव विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या सात परिमंडळासाठी पथक स्थापन करण्यात आले असून हे पथक आपले परिमंडळ सोडून दुसऱया परिमंडळात जाऊन कारवाई करणार आहे.
पावसाळ्यात उद्भवणाऱया मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळ, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने होणारे आजार रोखण्यासाठी आता मुंबईतील खाद्य पदार्थ विक्री करणाऱयांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत कारवाई
फुटपाथ, स्थानक परिसरातील संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत स्टॉल लावले जातात. त्यामुळे पालिकेचे पथक संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत कारवाई करणार आहे. यासाठी पालिकेच्या सात परिमंडळांत पथक स्थापन करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List