मिंधे गँग, भाजप आणि अजित पवार गट फुटणार, पक्ष चोरांना शिवसेनेत पुन्हा स्थान नाही- आदित्य ठाकरे

मिंधे गँग, भाजप आणि अजित पवार गट फुटणार, पक्ष चोरांना शिवसेनेत पुन्हा स्थान नाही- आदित्य ठाकरे

लोकसभेतील पराभवानंतर मिंधे गँग, भाजप व अजित पवार गटातून अनेक जण बाहेर पडतील. पण जे गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत, त्यांना आम्ही पुन्हा पक्षात घेणार नाही असे आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. राज्यातील हे सरकार फक्त सहा महिन्यांचे आहे. नोव्हेंबरला आपल्याला आपलं सरकार बसवायचे आहे. लोकसभा निवडणूक ही फक्त नांदी आहे. आज आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यापेक्षा मोठा मेळावा घ्यायचा आहे. आता खासदार आणि आमदार मिळून विजयी मेळावा साजरा करूया, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

जबाबदाऱया वाटून घेऊ

शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू झाली त्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, आजपासून आपल्या जबाबदाऱया वाटून घ्यायच्या आहेत. जास्त जबाबदाऱया घेऊ नका, फक्त नोंदणी करा असे आवाहन त्यांनी केले.विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱयांना मार्गदर्शन व विजयी मेळावा भायखळ्यात आयोजित करण्यात आला होता. या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, उपनेते रवींद्र मिर्लेकर, सचिन अहिर, अशोक धात्रक, मनोज जामसुतकर, राजकुमार बाफना, उपनेत्या किशोरी पेडणेकर, विभाग संघटक श्रद्धा जाधव, माजी महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून दणदणीत विजय मिळविणारे नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचा यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे सरकार फक्त सहा ते आठ महिनेच आहे. ज्यांना-ज्यांना वाटत आहे, मिंधे सरकारने घोळ केला आहे ते बाहेर पडतील. महाराष्ट्र प्रेमी अनेक खासदार बाहेर पडतील. भाजपची संसदीय मंडळाची बैठक झाली नाही. पण इंडिया आघाडीची बैठक झाली आहे. भाजपचे जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना सांगतो की लोकसभा अध्यक्ष तुमचा बनवा नाही तर भाजपचा लोकसभा अध्यक्ष झाल्यास पहिला तुमचा पक्ष फोडतील.

रिल मंत्री की रेल मंत्री?

भाजपने महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेल्या विधानसभा प्रभारींचा उल्लेख करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आजच पेंद्रीय मंत्र्यांना भाजपने प्रभारी केले आहे. ज्या मंत्र्यांच्या अखत्यारित एवढे मोठे रेल्वे खाते येते त्या रेल्वेचे गेल्या सहा ते आठ महिन्यांत अनेक अपघात झाले. आज सकाळीही रेल्वेचा एक अपघात झाला, पण हे फक्त वंदे भारतचे पह्टो टाकत असतात बाकी काम शून्य. हे रिल मंत्री आहेत की रेल मंत्री आहेत हेच कळत नाही. ना धड रेल्वे खातं सांभाळू शकतील नाही भाजप सांभाळू शकतील, असा सणसणीत टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी मारला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;