मोदी सरकारचा भोंगळ कारभार जनतेसाठी जीवघेणा ठरतोय, शरद पवार यांच्या पक्षाची टीका

मोदी सरकारचा भोंगळ कारभार जनतेसाठी जीवघेणा ठरतोय, शरद पवार यांच्या पक्षाची टीका

पश्चिम बंगालमधील जलपैयगुडी येथे काचंनजंगा एक्सप्रेसला मागून मालगाडी धडकल्याने भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेल्या कवच सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोदी सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा कवच यंत्रणा सुरू केली होती. मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर येत आहे. ही यंत्रणा असताना देखील गेल्या वर्षभरात अनेक रेल्वे अपघात झाले व त्यात अनेक प्नवाशांचे बळी गेले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ तत्कालिन रेल्वे मंत्री रेल्व सुरक्षा कवच बद्दल सांगताना दिसत आहेत. ”वारंवार रेल्वे अपघात घडत असून यात निष्पाप नागरिकांचा जीव जात असताना देखील मोदी सरकार मात्र हातावर हात ठेवून गप्प आहे. अपघात घडू नये यासाठी कधीकाळी उभारलेली रेल्वे सुरक्षा कवच यंत्रणा देखील कुचकामी ठरत असून मोदी सरकारच्या रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार जनतेसाठी मात्र जीवघेणा ठरत आहे”, असे ट्विट शरद पवार यांच्या पक्षाने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;