नरेंद्र मोदींना मुस्लिमांच्या जाळीदार टोपीत पहायचंय; नसीरुद्दीन शाह असं का म्हणाले?

नरेंद्र मोदींना मुस्लिमांच्या जाळीदार टोपीत पहायचंय; नसीरुद्दीन शाह असं का म्हणाले?

नसीरुद्दीन शाह हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्यांपैकी एक आहेत. अभिनयासोबतच ते त्यांच्या बेधडक वकव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. विविध मुलाखतींमध्ये ते राजकीय आणि सामाजिक विषयांवर मोकळेपणे व्यक्त होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. भविष्यात हे कोणत्या गोष्टीचं सूचक आहे, हेसुद्धा त्यांनी सांगितलं. नसीरुद्दीन शाह हे असंही म्हणाले की जर पंतप्रधान नरेंदी मोदी मुस्लिमांना ही गोष्ट समजावू शकले की ते त्यांचा द्वेष करत नाही, तर त्यांना खूप मदत होईल. ही गोष्ट सांगतानाच त्यांनी मोदींच्या जुन्या घटनेची आठवण करून दिली, ज्यावेळी त्यांनी मुस्लिमांची जाळीदार टोपी घालण्यास नकार दिला होता. या गोष्टीला विसरणं कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांना विचारलं गेलं की त्यांना जेव्हा समजलं की भाजपला बहुमत मिळालं नाही, 10 वर्षांमध्ये निवडणुकीत सर्वांत वाईट कामगिरी केली आणि देशात आघाडीचं सरकार येईल, तेव्हा त्यांच्या डोक्यात कोणता विचार आला? त्यावर ते म्हणाले, “सर्वांत आधी तर मला बरं वाटलं. नंतर मी स्वत:ला म्हटलं की ही पराभूत झालेल्यांसाठी, जिंकणाऱ्यांसाठी, हिंदू, मुस्लीम, सरकार आणि आपल्या सर्वांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे.” या नव्या सरकारकडून तुम्ही कोणत्या बदलाची अपेक्षा करता, असं विचारलं असता ते पुढे म्हणाले, “मोदींना विविध प्रकारच्या हेडगिअर्सचा (डोक्यावर घालणाऱ्या टोप्या) शौक असल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे मला त्यांना जाळीदार टोपीमध्ये पहायचंय. मला योग्य मुस्लीमसुद्धा पहायचे आहेत. द्वेषाचा प्रचार बंद व्हावा अशी माझी इच्छा आहे. मला अधिकाधिक महिलांना संसदेत पहायचंय. मोदींना अहंकार खूप आहे, ते कधीच या गोष्टीचा स्वीकार करणार नाहीत की जर चुकी केली आहे तर एक हावभाव म्हणून का होईना जाळीदार टोपी घातली पाहिजे.”

“एका कार्यक्रमात जेव्हा त्यांना काही मौलवींनी जाळीदार टोपी दिली तेव्हा त्यांनी ती घालण्यास नकार दिला होता. या गोष्टीला विसरणं खूप कठीण आहे. मोदींनी ती टोपी घातली असती तर आम्ही वेगळे नाही आहोत, हे ते मुस्लिमांना समजावू शकले असते. त्यांनी जाळीदार टोपी घातली तर त्याचा अर्थ असाच होणार की ते मुस्लीमसुद्धा या देशाचे नागरिक आहेत. ते त्यांचा द्वेष करत नाही, हे ते स्पष्ट करू शकले असते”, असं मत नसीरुद्दीन शाह यांनी मांडलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;