दहशतवादाच्या बळींच्या किंकाळय़ा मोदींना ऐकू येत नाहीत, राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा

दहशतवादाच्या बळींच्या किंकाळय़ा मोदींना ऐकू येत नाहीत, राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा

एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून देशावर तीन दहशतवादी हल्ले झाले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी या हल्ल्याबाबत अजूनपर्यंत एक अवाक्षरही काढलेले नाही. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सद्वारे सडकून टीका केली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा संदेशांना उत्तरे देण्यात व्यस्त असणाऱया मोदींना दहशतवादाच्या बळींच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

रियासी, कठुआ आणि डोडा येथे गेल्या तीन दिवसात तीन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या. परंतु, मोदी अजूनही जल्लोषात मग्न आहेत. भाजप सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारे का पकडले जात नाहीत, याचे उत्तर देश मागत आहे, असे आपल्या पोस्टमध्ये नमूद करत राहुल यांनी हल्ला चढवला. शुभेच्छा संदेशांना रिप्लाय देण्यात व्यस्त असलेल्या मोदींना जम्मू-कश्मीरमध्ये निर्घृणपणे ठार मारण्यात आलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाहीत, असा संताप राहुल यांनी व्यक्त केला.

वाढते दहशतवादी हल्ले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. पाकिस्तानी नेत्यांच्या शुभेच्छांनाही मोदी यांनी एक्सद्वारे दाद दिली. परंतु, निर्घृण दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. 10 वर्षांपासून मोदी सरकार खोटी छाती बडवत आहे. मात्र प्रत्यक्षात आजही निष्पाप नागरिक दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत असून स्थिती अजिबात बदललेली नाही, अशी टीका काँग्रेसने केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पोस्टवर प्रतिक्रीया देण्यात मोदी व्यग्र आहेत. परंतु, दहशतवादी हल्ल्यांबाबत का गप्प आहेत? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;