‘वायनाड की रायबरेली’ कोणती जागा निवडणार? राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

‘वायनाड की रायबरेली’ कोणती जागा निवडणार? राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले राहुल गांधी कोणता मतदार संघ सोडणार याकडे साऱ्या देशाचं लक्षं लागलं आहे. यासंदर्भात खुद्द राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितलं की त्यांनी कोणता मतदारसंघ सोडावा या संभ्रमात ते आहेत.

मात्र जो काही निर्णय घेतला जाईल, त्यातून दोन्ही मतदारसंघांना त्याचा आनंद होईल, असंही त्यांनी सांगितलं.

केरळच्या मलप्पुरम येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी लोकसभेत दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल वायनाडच्या जनतेचे आभार मानले आणि म्हणाले, ‘मी लवकरच तुम्हाला भेटण्यास उत्सुक आहे’.

‘माझ्यासमोर एक पेच आहे की, मी वायनाडचा खासदार व्हायचं की रायबरेलीचा. मी तुम्हाला असं वचन देतो की म्हणजे वायनाड आणि रायबरेली दोघेही माझ्या निर्णयावर खूश असतील’, असं काँग्रेस नेते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

रॅलीमध्ये, काँग्रेस नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आणि म्हणाले की देवाने पंतप्रधानांना देशातील प्रमुख विमानतळ आणि वीज प्रकल्प अदानीकडे सोपवण्याचे निर्देश दिले.

‘दुर्दैवाने, मला देवाचे मार्गदर्शन मिळालेले नाही, मी एक माणूस आहे. नरेंद्र मोदींचा ‘परमात्मा’ त्यांना सर्व निर्णय अंबानी आणि अदानींच्या बाजूने घेण्यास भाग पाडतो. माझ्याकडे ही लक्झरी नाही. खरं तर, माझ्यासाठी हे खूप सोपे आहे. माझा देव हिंदुस्थानातील गरीब लोक आहेत, माझ्यासाठी फक्त लोकांशी बोलणे सोपे आहे आणि हा माझा देव मी काय करावं ते मला सांगतो’, असं ते म्हणाले.

वायनाड मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजयी झाल्यानंतर राज्यात राहुल गांधी पहिल्यांदाच हजर झाले होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीतील लढा हा देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी होता आणि त्या लढ्यात द्वेषाचा प्रेम आणि आपुलकीनं, अहंकाराचा नम्रतेनं पराभव झाल्याचेही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं.

पंतप्रधान मोदींना आता आपला दृष्टिकोन बदलावा लागेल कारण देशातील जनतेने त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे, असंही गांधी म्हणाले. तसेच केंद्रात स्थापन झालेल्या सरकारचा ‘पंगू’ सरकार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;