Dombivali Fire – पूर्वीच्या घटनेतून सरकार काही शिकलेले दिसत नाही, अंबादास दानवे यांची टीका
डोंबिवलीतील एमआयडीसी येथील एका कंपनीत 20 दिवसांपूर्वी बॉयलर स्फोट झाला होता त्या दुर्घटनेत 11 कामगारांचा मृत्यू झाला होता तर 50 हून अधिक जखमी झालेले. ही घटना ताजी असतानात मंगळवारी पुन्हा ड़ोंबिवलीतील याच भागात एका कंमनीत स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. ही आग इतर कंपन्यांमध्येही पसरली असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये परत आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या कंपन्यांचे फायर सेफ्टी ऑडिट सरकारने करून घ्यायला हवे. पूर्वीच्या घटनेतून सरकार काही शिकलेले दिसत नाही. असे उद्योग स्थलांतरित करण्यावर तातडीने भर द्यावा. आता इलेक्शन मोडमधून सरकारने बाहेर यावं. #Dombivalifire
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 12, 2024
डोंबिवलीत पुन्हा झालेल्या या स्फोटानंतर तेथील स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यससरकारवर निशाणा साधला आहे.
”डोंबिवली एमआयडीसीमध्ये परत आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या कंपन्यांचे फायर सेफ्टी ऑडिट सरकारने करून घ्यायला हवे. पूर्वीच्या घटनेतून सरकार काही शिकलेले दिसत नाही. असे उद्योग स्थलांतरित करण्यावर तातडीने भर द्यावा. आता इलेक्शन मोडमधून सरकारने बाहेर यावं”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List