महाराष्ट्राला ही सावत्र वागणूक कशासाठी? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

महाराष्ट्राला ही सावत्र वागणूक कशासाठी? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा केंद्रात सत्तास्थापन केली. सत्तास्थापनेनंतरच्या पहिल्याच निधी वाटपात महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय झाल्याचे दिसून आले आहे. .या निधीवाटपात बिहारला 14056 कोटी रुपये दिले गेले तर सर्वात जास्त जीएसटीचे करसंकलन करणाऱ्या महाराष्ट्राला निर्मला सितारामन यांनी 8828 कोटी रुपये दिले.

या निधीवाटपावरून सध्या विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावरून टीका करत केंद्र सरकारला सवाल केला आहे. ”निधीवाटपात महाराष्ट्राला एवढा कमी निधी का? ही सावत्र वागणूक कशासाठी?”, असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारला याबाबत प्रश्न केला आहे.

महाराष्ट्रातून भाजपला या लोकसभा निवडणूकीत हवे तसे यश मिळाले नाही. भाजपच्या तब्बल 18 जागा या निवडणूकीत घटल्या. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूच्या टेकूवर नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्तास्थापन केले. या निधी वाटपात सर्वाधिक निधी हा उत्तर प्रदेशला मिळाला. उत्तर प्रदेशला 25069 कोटींचे पॅकेज मिळाले. त्याखालोखाल मोदींच्या सत्तास्थापनेला टेकू दिलेल्या बिहारला 14056 कोटी रुपये दिले गेले. तर सर्वात जास्त जीएसटीचे करसंकलन करणाऱ्या महाराष्ट्राला निर्मला सितारामन यांनी 8828 कोटी रुपये दिले. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे समोर आले आहे.

पश्चिम बंगालला 10553 कोटी रुपये, महाराष्ट्राला 8828 कोटी रुपये देण्यात आले आहेत. राजस्थानला 8421 कोटी, ओडिशाला 6327 कोटी, तमिळनाडूला 5700 कोटी, आंध्र प्रदेशला 5655 कोटी, गुजरातला 4860 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;