कोल्हापूर-पन्हाळा रस्ता बनतोय धोकादायक; भेगांमुळे रस्ता खचू लागला; वाहनधारकांचा जीव धोक्यात, ‘सार्वजनिक बांधकाम’चे दुर्लक्ष

कोल्हापूर-पन्हाळा रस्ता बनतोय धोकादायक; भेगांमुळे रस्ता खचू लागला; वाहनधारकांचा जीव धोक्यात, ‘सार्वजनिक बांधकाम’चे दुर्लक्ष

नेहमी वाहतुकीच्या वर्दळीने गजबजलेल्या कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील कोल्हापुरातील शिवाजी पूल ते केर्ली हा सात ते आठ कि.मी.चा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यावर मोठमोठय़ा भेगा पडल्या असून, ठिकठिकाणी रस्ता खचत चालल्याचे दिसून येत आहे.

अगोदरच या मार्गावर दररोज लहान-मोठय़ा अपघातांच्या घटना घडत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरणार असल्याने कोणाचातरी नाहक बळी जाण्यापूर्वी हा मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची सुबुद्धी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कधी येणार? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.

तळकोकणला जोडणारा कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय मार्ग असून, पन्हाळा, विशाळगडासह कोकण भागात जाणाऱया व्यावसायिक, नोकरदार, पर्यटक अशा वाहनधारकांची सतत वर्दळ असते. अगोदरच अरुंद रस्ता, वाहनांची वर्दळ आणि अपघातांची संख्या पाहता, या मार्गाचे रुंदीकरण करणे आवश्यक असताना, आता मोठमोठय़ा भेगा आणि रस्ता खचत चालल्याचे दिसून येत आहे. महापुरात या रस्त्यावर केर्ली फाटा येथे पाणी येऊन मार्ग बंद होतो. पावसामुळे या भेगांत पाणी गेल्यास हा मार्ग वाहनधारकासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे सध्या पावसाने अधिक जोर धरण्यापूर्वी संबंधित बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या 134 कि.मी.च्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने दोन हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, याचे काम जलद गतीने सुरू आहे. पूर्वी हा महामार्ग कोल्हापूर शहरातून जात असल्याने, पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलापर्यंत रस्त्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होती; पण आता हा महामार्ग केर्ली येथून बायपास करून, केर्ली ते बंगळुरू महामार्गावर शिये-चोकाक असा नेल्यामुळे केर्ली ते शिवाजी पूल या अंतराच्या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कोणाची? हा प्रश्नही यानिमित्ताने दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;