प्रियांका वाराणसीतून लढली असती तर, मोदी 2-3 लाख मतांनी हरले असते – राहुल गांधी

प्रियांका वाराणसीतून लढली असती तर, मोदी 2-3 लाख मतांनी हरले असते – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता एक मोठा दावा केला आहे. आपली बहीण प्रियांका गांधी वाड्रा ही वाराणसीमधून निवडणूक लढली असती तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दारूण पराभव झाला असता, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांची रायबरेलीत सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर मतदारांचे आभार मानन्यासाठी राहुल गांधी यांची ही सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी रायबरेलीसह उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला मोठे यश मिळाले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे.

प्रियांका वाराणसीमधून निवडणूक लढली असती तर आज हिंदुस्थानचे पंतप्रधान दोन ते तीन लाख मतांनी पराभूत झाले असते. मी अहंकारातून बोलत नाही. याचे कारण म्हणजे पंतप्रधानांना हिंदुस्थानच्या जनतेने दिलेला संदेश. आम्हाला तुमचे राजकारण पटलेले नाही आणि आम्ही त्याविरोधात आहोत. आम्ही द्वेष आणि हिंसेच्या विरोधात आहोत, हा संदेश जनतेने दिल्याचे राहुल गांधी म्हणाले.

‘जनतेचे आभार’

काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते आणि अमेठी आणि रायबरेलीतील जनतेने आम्हाला विजयी केले, त्याबद्दल आभार मानतो. यावेळी काँग्रेस अमेठी, रायबरेली, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशात एकजुटीने लढली. यावेळी समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही काँग्रेस नेत्यांसोबत मिळून निवडणूक लढवली, असे ते पुढे म्हणाले.

अमेठीत किशोरी लाल शर्मा, रायबरेलीत मला आणि उत्तर प्रदेशात ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांचा मोठा विजय झाला. यूपीने संपूर्ण देशाचे राजकारण बदलले आहे. संविधानाला हात लावाल तर तुमचे काय हाल होतील, हा संदेश जनतेने निकालातून दिला आहे. मोदी संविधानासमोर नतमस्तक झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. हे देशाच्या जनतेने केले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;