लातूर जिल्ह्यात गोगलगायींचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर नवे संकट

लातूर जिल्ह्यात गोगलगायींचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर नवे संकट

लातूर जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, सोमवारी रात्री झालेल्या पावसाने पेरणी वाया गेली आहे. यातच पुन्हा लातूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा धोका असून गोगलगायीवर लवकर उपाय करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगायीचा फटका मागील तीन वर्षापासून बसत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेले सोयाबीन गोगलगाईनी संपवून टाकले होते. लातूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे या वर्षी गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पेरणीपूर्वी गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. केशवराव साळुंके यांच्या शेतात गोगलगायी मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी राऊत यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच गोगलगाय नष्ट करण्यासाठी संबंधित शेतकरी आणि परिसरातील शेतकरी यांचे प्रबोधन केले आहे. गोगलगाय नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिक पण दाखवलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

बाभळगाव येथील शेतकरी केशवराव साळुंके यांनी सांगितले की, गोगलगाय प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागास कळवले. त्यांनी येऊन पाहणी पण केली आहे. गोगलगायी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बांधावर गुळाच्या गोण्या अंथरण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही गोगलगायी गोळा केलेल्या आहेत. पण इतर कोणी शेतकरी अजून या कडे लक्ष देत नाहीत. गोगलगायीची अंडी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. असेही त्यांनी सांगितले. मागील वर्षी गोगलगाय प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने मेटाल्डिहाईट किटकनाशक वापरले होते. त्यामुळे गोगलगाय प्रतिबंध झालेला होता. गोगलगायी मरत होत्या पण अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा खर्च परवडत नाही, असेही केशवराव साळुंके यांनी सांगितले.

कृषी विभागाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मेटाल्डिहाईट किटकनाशक पुरवठा केले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर मिळेलच पण होणारे आर्थिक नुकसान पण टळेल. विद्यमान शासनाचे धोरण पाहता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग ठोस उपाययोजना करणार की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;