मणिपूरला प्राधान्य द्या, हिंसाचार थांबवा; मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान

मणिपूरला प्राधान्य द्या, हिंसाचार थांबवा; मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान

मणिपूरमध्ये वर्षभरापासून हिंसाचार उफाळला आहे. केंद्र आणि राज्य सरकार येथील हिंसाचार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलत नाही, तसेच येथील हिंसाचाराला परकीय देशांचा हातभार लागतो आहे. मणिपूरच्या हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी सरकारला घेरले होते. मात्र, सरकारने मणिपूरच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारचे कान टोचले आहेत. या हिंसाचाराबाबत भागवत यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

सरकारने मणिपूर प्रश्नाला प्राधान्य द्यावे. तेथील हिंसाचार रोखण्याची गरज आहे. मणिपूर एक वर्षापासून शांततेची वाट पाहत आहे. हिंसाचार थांबवायला हवा आणि या मुद्द्याला प्राधान्य द्यायला हवे, अशा श्ब्दांत मोहन भागवत यांनी सरकारचे कान टोचले. आता संघाकडूनही हा मुद्दा उचलण्यात आल्याने आतातरी सरकार या गंभीर समस्येकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मणिपूरमधील जनता वर्षभरापासून हिंसाचारात होरपळत आहे. तेथील जनतेला शांतता हवी आहे. या राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न होण्याची गरज आहे. आपण आपले कार्य करावे, मात्र त्याचा अहंकार बाळगू नये, असे करणारेच जनतेचे खरे सेवक आहेत, असेही भागवत यांनी म्हटले आहे. आपल्याला माणसांची प्रवृत्ती बदलायला वेळ लागेल. मात्र, येथे वर्षभरापासून हिंसाचार भडकत असल्याने या समस्येला प्राधान्य देत शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मणिपूरमधील हिंसाचाराबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रथमच वक्तव्य करण्यात आल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;