रवी शास्त्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेली अमृता करणार होती लग्न; क्रिकेटरच्या एका अटीमुळे झाला ब्रेकअप
बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक लव्ह-स्टोरी आहेत, ज्या कधी पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मात्र त्यांची चर्चा आजही होते. अशीच एक लव्ह-स्टोरी अभिनेत्री अमृता सिंग आणि क्रिकेटर रवी शास्त्री यांची होती. हे दोघं एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
अमृता आणि रवी शास्त्री हे एकमेकांशी लग्नसुद्धा करणार होते. मात्र रवी शास्त्री यांच्या एका अटीमुळे दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. या दोघांची पहिली भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा विचार केला.
रवी शास्त्री यांनी अमृता सिंगसमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर चित्रपटात काम करायचं नाही, अशी ही अट होती. अमृताला ही अट मंजूर नव्हती. या अटीबाबत दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. मात्र त्यातून काही उपाय निघाला नाही. अखेर अमृताने तिच्या करिअरला प्राधान्य देत ब्रेकअप केलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List