‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर; लग्नानंतर पहिल्याच दिवशी..
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत नुकतंच आकाश आणि वसुचा लग्नसोहळा पार पडला. वसुंधराने बनीसोबत आपल्या सासरी गृहप्रवेश केला. कधी न पाहिलेला असा गृहप्रवेश सगळ्यांनी पाहिला.
लग्नाच्या पहिल्या रात्री आकाश - वसुने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे चिनू-मनू ,बनीसाठी आपण वेगळ्या खोलीत आपल्या मुलांसोबत झोपायचं. हे सगळं होत असताना वसुचं मन तिला खातंय. वसुने आकाशपासून तिच्या पहिल्या नवऱ्याचं सत्य लपवलं आहे.
सासरी पहिल्याच दिवशी वसुला सतत फोनवर पाहून तिला या घरात लक्ष द्यायला सांगते. लवकरात लवकर चिनू-मनूच्या आईची जबाबदारी उचलून आकाशसोबतही आपलं एक प्रेमाचं नातं तयार करून सुखी संसाराचं वचन मागते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List