भाजपला जनादेश नाही, त्यांनी सरकार स्थापन करू नये; काँग्रेसच्या नेत्याने सुनावले

भाजपला जनादेश नाही, त्यांनी सरकार स्थापन करू नये; काँग्रेसच्या नेत्याने सुनावले

लोकसभा निवडणुकीत भाजपला जनतेने चांगलाच दणका दिला आहे. 400 पारच्या घोषणा देणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. त्यामुळे आता इतर पक्षांच्या एनडीएच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, भाजपला जनादेश नाही, त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करू नये, असे काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी भाजपला सुनावले आहे. यावेळी त्यांनी 35 वर्षांपूर्वीचा एक किस्साही सांगितला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला जनतेने नाकारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू नये, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन करण्याऐवजी भाजपने आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपने सरकार स्थापन करू नये, असे सांगत त्यांनी 35 वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगितला. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला सुमारे 200 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना सरकार बनवण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी आपल्याला जनादेश मिळाला नसल्याचे सांगून सरकार स्थापनेस नकार दिला. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास सांगितले होते. आता लोकसभेचे निकाल हे भाजप आणि एनडीएच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करु नये, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने विशेषत: विरोधकांना लक्ष्य केले. सीबीआय, ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा भाजपने गैरवापर केला. त्यांची ही सर्व कामे जनतेने नाकारल्याचे पायलट म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पार चा नारा दिला होता. मात्र, भाजपला 250 जागांही मिळाल्या नाहीत. त्यामुळे जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;