रत्नागिरी-सिंधुदुर्गात नऊपैकी सात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नऊ उमेदवार निवडणूक लढवत होते. त्यापैकी सात उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त झाली आहे. नारायण राणे आणि विनायक राऊत हे दोन उमेदवार सोडले तर इतर 7 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. विनायक लहू राऊत यांना 15 हजार 769 मते मिळाली. मारूती जोशी यांना 9 हजार 873, राजेंद्र आयरेंना 7 हजार 856, अशोक पवार यांना 5 हजार 244, सुरेश शिंदे यांना 2 हजार 209, अनंत तांबे यांना 5 हजार 563 मते मिळाली. त्यामध्ये विनायक लहू राऊत यांनी लक्षवेधी मते घेतली तसेच नोटाला 11 हजार 516 मते पडली आहेत.
एकूण वैध मते 9 लाख 2 हजार 395 आहेत. या वैध मतांच्या 1/6 मते न मिळाल्याने सातजणांची प्रत्येकी 25 हजाराची अनामत रक्कम जप्त होणार आहे. त्यामुळे या उमेदवारांचे 1 लाख 75 हजार शासनदरबारी जमा होणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List