उत्तरकाशीतील मृतांची संख्या नऊवर
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सहस्रताल शिखरावर चढाई करण्यासाठी गेलेल्या गिर्यारोहकांच्या समूहातील अपघातातील मृतांची संख्या नऊवर पोहोचली आहे. थंडीमुळे गिर्यारोहकांच्या या समूहातील चार महिलांसह पाच जणांची प्रकृती खालावून मृत्यू झाला होता. यात आशा (71), सिंधू (45), सुजाता (51), चित्रा परिणित (48) आणि विनायक (54) अशी मृत्युमुखी पडलेल्या पाच गिर्यारोहकांची नावे आहेत. या गिर्यारोहकांचा समूहाचा गाईड आणि इतर चार जण अद्याप बेपत्ता आहेत. परंतु हे जीवित असण्याची शक्यता कमी आहे. हवाई दलाने शोध आणि बचाव मोहीम चालू ठेवली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List