अप्पी-अर्जुन अखेर एकत्र येणार? ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत मोठा ट्विस्ट
झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथाकन रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. बाबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी अर्जुन आर्यासोबत लग्न करायचा निर्णय घेतो.
दुसरीकडे रुपाली बाबांची परिस्थिती बघून चिडते आणि ती अर्जुनकडून त्याच्या नकळत अप्पीला घटस्फोटाचे पेपर्स पाठवते. घटस्फोटाचे पेपर्स पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला अमोलचं टेन्शन येतं.
अप्पीने बाबाचं वर्णन जसं केलं त्यावरून अमोल एक चित्र काढतो. तो यात बापू, दिप्या, गायतोंडे, अप्पी या सर्वांची मदत घेतो आणि ते चित्र पूर्ण करायला लागतो. अप्पीला विनायकची परिस्थिती समजते आणि ती त्यांना जाऊन भेटते.
तेव्हा रुपाली तिला विनायकने घेतलेल्या वचनाबद्दल सांगते आणि अर्जुन आणि आर्याचा साखरपुडा होणार असल्याचं सांगते. अप्पी तिथून निघताना विनायकची परिस्थिती आणि अर्जुनने विनायकला दिलेल्या वचनाचा विचार करून घटस्फोटाच्या पेपर्सवर सही करून पाठवते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List