Monsoon 2024 : मुसळधार पाऊस कोसळणार! पुढील 5 दिवस राज्यातील जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शुभ वार्ता आहे. हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. आता पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने राज्यातील जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या तीन-चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याची माहिती होसाळीकर यांनी ट्विटमधून दिली आहे.
6th June: Extended range forecast for rainfall by IMD for coming 4 weeks
June looks better as it progresses. West coast looks like will remain busy throughout!! pic.twitter.com/bXROASxFjA— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2024
पुढील 4 आठवडे राज्यात मुसळधार पाऊस
हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. 6 जून ते 13 जून, 13 जून ते 20 जून, 20 जून ते 27 जून आणि 27 जून ते 4 जुलै अशा चार आठवड्यांचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील 4 आठवडे राज्यात मुसळधार पाऊस
हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. 6 जून ते 13 जून, 13 जून ते 20 जून, 20 जून ते 27 जून आणि 27 जून ते 4 जुलै अशा चार आठवड्यांचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
6 जून : हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस ांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. #रत्नागिरी आणि #सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असून येत्या तीन, चार दिवसांत #मुंबईसह #महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे
IMD pic.twitter.com/4pNUDir9T7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2024
रत्नागिरीत पाऊस
कडक उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या रत्नागिरीकरांना आज सायंकाळी आलेल्या पावसाने दिलासा दिला. आज सायंकाळी रत्नागिरी शहरात ढगांनी आभाळ भरून आले आणि काही क्षणात वरूणराजा बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे रत्नागिरीकरांची त्रेधातिरपीट उडाली. पाऊस सुरू होताच अनेकांनी दुकानाचा आडोसा घेतला तर काही मंडळींनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
पावसाच्या सरींनी हर्णेमध्ये रस्त्यावर तुंबले पाणी
पावसाच्या बरसलेल्या सरींनी दापोली तालुक्यातील हर्णेमध्ये रस्त्यावर पाणी तुंबले. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाचे झाले तर उकाड्याने त्रासलेल्यांना सुखाच्या गारव्याचा दिलासा मिळाला. वातावरणात जाणवणारा असह्य उष्म्याचा कडाका सध्या सहन होईनासा झाला आहे. त्यातच हर्णेमध्ये अचानकपणे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे घराबाहेर पडलेल्यांची एकच धावपळ उडाली. अचानक कोसळलेल्या पावसाच्या सरींनी रस्त्यावर पाणी तुंबले. यामुळे वाहनचालकांना मार्ग काढणे जिकरीचे होत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List