Monsoon 2024 : मुसळधार पाऊस कोसळणार! पुढील 5 दिवस राज्यातील जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

Monsoon 2024 : मुसळधार पाऊस कोसळणार! पुढील 5 दिवस राज्यातील जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शुभ वार्ता आहे. हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. आता पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने राज्यातील जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या तीन-चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याची माहिती होसाळीकर यांनी ट्विटमधून दिली आहे.

पुढील 4 आठवडे राज्यात मुसळधार पाऊस

हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. 6 जून ते 13 जून, 13 जून ते 20 जून, 20 जून ते 27 जून आणि 27 जून ते 4 जुलै अशा चार आठवड्यांचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील 4 आठवडे राज्यात मुसळधार पाऊस

हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. 6 जून ते 13 जून, 13 जून ते 20 जून, 20 जून ते 27 जून आणि 27 जून ते 4 जुलै अशा चार आठवड्यांचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रत्नागिरीत पाऊस

कडक उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या रत्नागिरीकरांना आज सायंकाळी आलेल्या पावसाने दिलासा दिला. आज सायंकाळी रत्नागिरी शहरात ढगांनी आभाळ भरून आले आणि काही क्षणात वरूणराजा बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे रत्नागिरीकरांची त्रेधातिरपीट उडाली. पाऊस सुरू होताच अनेकांनी दुकानाचा आडोसा घेतला तर काही मंडळींनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

पावसाच्या सरींनी हर्णेमध्ये रस्त्यावर तुंबले पाणी

पावसाच्या बरसलेल्या सरींनी दापोली तालुक्यातील हर्णेमध्ये रस्त्यावर पाणी तुंबले. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाचे झाले तर उकाड्याने त्रासलेल्यांना सुखाच्या गारव्याचा दिलासा मिळाला. वातावरणात जाणवणारा असह्य उष्म्याचा कडाका सध्या सहन होईनासा झाला आहे. त्यातच हर्णेमध्ये अचानकपणे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे घराबाहेर पडलेल्यांची एकच धावपळ उडाली. अचानक कोसळलेल्या पावसाच्या सरींनी रस्त्यावर पाणी तुंबले. यामुळे वाहनचालकांना मार्ग काढणे जिकरीचे होत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;