संसदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवले

संसदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवले

हिंदुस्थानच्या लोकशाहीचं मंदिर अशी ओळख असलेली वास्तू म्हणजे संसद भवन. या संसदेच्या प्रांगणात वास्तू समोरच बसवलेले महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सपोस्टवर काही फोटो शेअर केले असून त्यात या पुतळ्यांना हटवण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येत आहे. ते लिहितात की, संसदेच्या प्रांगणातले, मूळ वास्तूच्या समोरच ठळकपणे दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आताच त्यांच्या जागेवरून हटवण्यात आले आहेत. हे अतिशय वाईट आहे, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;