ज्यांनी सीतेवर संशय घेतला ते.. अयोध्येतील लोकांवर भडकले रामायणातील ‘लक्ष्मण’

ज्यांनी सीतेवर संशय घेतला ते.. अयोध्येतील लोकांवर भडकले रामायणातील ‘लक्ष्मण’

ज्यांनी सीतेवर संशय घेतला ते.. अयोध्येतील लोकांवर भडकले रामायणातील ‘लक्ष्मण’

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी हे लोकसभा निवडणूक निकालावर प्रचंड नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणूक निकालात भाजपच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राममंदिर उभारणीनंतर अवघ्या काही महिन्यांनी अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झाला. यावर सुनील लहरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अयोध्येतील लोकांनी राम मंदिर बनवणाऱ्या भाजपला मतदान केलं नाही, याचा राग त्यांनी सोशल मीडियावर बोलून दाखवला. उत्तरप्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघात भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव झाला. याठिकाणी समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद जिंकून आले. सुनील यांनी बुधवीर त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित अयोध्येतील लोकांवर संताप व्यक्त केला.

सुनील लहरी यांची पोस्ट-

रामायणाचा संदर्भ देत सुनील लहरी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिलं, ‘आम्ही हे विसरलो की हे तेच अयोध्यावासी आहेत, ज्यांनी वनवासातून आल्यानंतर सीता मातेवर शंका घेतली होती. जी व्यक्ती देव प्रकट झाल्यावर त्यांना नकार देत असले तर अशा व्यक्तीला काय म्हणतात? स्वार्थी! इतिहास साक्षीदार आहे की अयोध्येतील लोकांनी नेहमीच त्यांच्या खऱ्या राजासोबत विश्वासघात केला आहे. धिक्कार आहे!’

आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी पुन्हा एकदा अयोध्येतील लोकांवर निशाणा साधला. ‘अयोध्येतील लोकांनो.. तुमच्या महानतेला मी नमन करतो. तुम्ही तर सीता मातेलाही सोडलं नव्हतं. त्यामुळे रामाला तंबूतून बाहेर काढून भव्य मंदिरात विराजमान करणाऱ्यांची फसवणूक करणं कोणती मोठी गोष्ट आहे? तुम्हाला कोटी कोटी प्रणाम! संपूर्ण भारत तुम्हाला कधी चांगल्या नजरेनं पाहणार नाही’, असं म्हणत त्यांनी हात जोडलेले इमोजी पोस्ट केले.

संतप्त सुनील लहरी यांनी तिसऱ्या पोस्टमध्ये अयोध्येतील लोकांचा ‘बाहुबली’ या चित्रपटातील कटप्पाच्या भूमिकेशी तुलना केली. ‘बाहुबली: द बिगनिंग’ या चित्रपटात कटप्पा त्याचा राजा अमरेंद्र बाहुबलीची हत्या करतो.

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्यावेळी अयोध्येचा कायापालट कशा पद्धतीने झाला, याची तुफान चर्चा रंगली होती. त्यामुळे अयोध्येत भाजपचा विजय नक्कीच होईल, असा विश्वास अनेकांना होता. मात्र प्रत्यक्षात निकाल पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. सुनील लहरी यांच्यासोबत ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे मात्र मेरठ या मतदारसंघातून निवडून आले. त्यांना सुनील लहरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;