भाजपला कोणी हरवू शकत नाही हा गैरसमज मोडून काढला, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

भाजपला कोणी हरवू शकत नाही हा गैरसमज मोडून काढला, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

लढाईला आता सुरुवात झाली आहे. ही आपली पहिली लढाई होती. शिवसैनिकांची अफाट मेहनत आणि आशीर्वाद यांचा मी ऋणी आहे. हे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.

भारतीय जनता पक्षाला कोणी हरवू शकत नाही हा गैरसमज शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत मोडून काढला, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले. लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांनी शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभारही मानले.

शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. नाशिकमधील विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे आणि ईशान्य मुंबईतील संजय दिना पाटील यांचा त्यात समावेश होता. असंख्य शिवसैनिकांसह वाजतगाजत ते ‘मातोश्री’वर पोहोचले होते. शिवसेनेच्या जयघोषाने यावेळी परिसर दुमदुमला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी विजयी उमेदवार आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेला मिळालेले यश हे शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आहे, मी निमित्तमात्र आहे, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. सर्वांना मनापासून धन्यवाद देतानाच ते म्हणाले की, लढाईला आता सुरुवात झाली आहे. ही आपली पहिली लढाई होती. शिवसैनिकांची अफाट मेहनत आणि आशीर्वाद यांचा मी ऋणी आहे. हे प्रेsम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. या प्रेमाला आणि आशीर्वादाला मी दगा देणार नाही, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. यावेळी हे यश तुमच्या नेतृत्वामुळेच शक्य झाल्याचे सांगत शिवसैनिकांनीही उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद दिला.

जनतेला धन्यवाद देण्यासाठी राज्यभर फिरणार

शिवसेनेला विजय मिळवून देणारे शिवसैनिक आणि तमाम जनतेला धन्यवाद देण्यासाठी आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानत अभिनंदनही केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;