लीला, वसुंधरा, पारूच्या नवीन आयुष्यात घडणार मोठा बदल
झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'लग्न सराई विशेष' भागांमध्ये ‘पारू-आदित्य’, ‘आकाश-वसुंधरा’ आणि ‘एजे-लीला’ लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. या तीन जोडप्यांचं नातं भलेही प्रेमाच्या पायावर जोडलं गेलं नसेल, पण त्यांच्यासमोर येणारं आयुष्य काय बदल घडवेल ते बघण्यासारखं असणार आहे.
'पारू आणि आदित्य'चं लग्न केवळ एक जाहिरातीच्या शूटसाठी होतं. पण ही जाहिरात किर्लोस्करांची होती. तर त्यांचा थाटसुद्धा तसाच होता. दुसरं जोडपं 'आकाश-वसुचं' असून त्यांच्या नात्याची सुरुवात वसुच्या मनात नसतानादेखील केवळ सासू सासऱ्यांच्या विनंतीखातर झाली.
या लग्नात संगीत पासून ते लग्नापर्यंत सर्व कार्यक्रम सुंदरपणे रचले गेले होते. लाल आणि पिवळ्या रंगाच्या सहावारी नेसून, केसात लाल-पिवळे गुलाब माळून वसु नवरी रूपात सजली होती. तर आकाशने हलक्या पांढऱ्या रंगाच्या शेरवानी सोबत एक लाल रंगाचा शेला खांद्यावर ओढला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List