अशा पुरुषांपासून दूरच..; संजीदाच्या टिप्पणीवर आमिर अलीचं सडेतोड उत्तर

अशा पुरुषांपासून दूरच..; संजीदाच्या टिप्पणीवर आमिर अलीचं सडेतोड उत्तर

अभिनेता आमिर अली आणि संजीदा शेख ही एकेकाळी टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर या दोघांनी 2020 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2021 मध्ये ते कायदेशीररित्या वेगळे झाले. या दोघांना आयरा ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत संजीदाने आमिरवर काही आरोप केले होते. “असे काही पार्टनर्स असतात जे तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काहीच करू शकत नाही, असं ते तुम्हाला सांगतात किंवा ते म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट करू शकणार नाही. अशा लोकांपासून दूरच राहिलेलं चांगलं असतं,” असं संजीदा म्हणाली होती. त्यावर आता आमिरने प्रतिक्रिया दिली आहे.

“ती आणि मी एकमेकांबद्दल जे काही बोलतो ते सर्व आमच्याबद्दलच असतं असं नाही. आम्ही आता जवळपास गेल्या पाच वर्षांपासून एकत्र नाही आहोत. कदाचित त्या कालावधीत तिला असा एखादा अनुभव आला असावा. आमची कथा खूप जुनी झाली आहे आणि ती संपली आहे. विभक्त होण्याच्या त्या कालावधीत मी कोणत्या परिस्थितीचा सामना केला आणि माझ्यासोबत काय झालं हे मलाच माहीत आहे. पण सार्वजनिकरित्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं हा माझा स्वभाव नाही. मी कधीच कोणाला कमी लेखलं नाही आणि खासकरून ज्या व्यक्तीसोबत माझं एक नातं होतं, त्यांच्यासोबत तसं करणारही नाही”, असं आमिर ‘न्यूज 18 शोशा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Ali (@aamirali)

आमिर आणि संजीदा यांची पहिली भेट ‘क्या दिल में है’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर सरोगसीद्वारे त्यांना मुलगी झाली. घटस्फोटानंतर संजीदाला मुलीचा ताबा मिळाला. एका मुलाखतीत आमिरने संजीदावर आरोप केला होता की ती त्याला त्याच्या मुलीला भेटू देत नाही.

घटस्फोटाबद्दल संजीदा म्हणाली, “माझ्यासोबत जे काही घडलं त्यातून मला बाहेर पडता आलं यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. त्यावेळी मला असं वाटलं होतं की मीच सर्वांत नैराश्यग्रस्त व्यक्ती आहे किंवा मीच फार दु:खी आहे. माझ्यासोबत हे सर्व काय घडतंय? माझ्या आयुष्यासोबत हे काय झालं? पण त्या सर्व गोष्टींमधून बाहेर पडता आल्याने आणि स्वत:वर पुन्हा प्रेम करता आल्याने मी नशिबवान समजते.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;