मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात संचारबंदी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एकतर्फी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. त्याबरोबरच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, विविध राजकीय पक्षांची भूमिका विचारात घेता जय, पराजयावरून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी आपल्या अखत्यारीत एकतर्फी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. हा आदेश दुकाने, आस्थापनांना लागू असेल.
खालील बाबींना सूट
शासकीय/निमशासकीय कार्यालये.
दूध वितरण.
पाणीपुरवठा
रेल्वे व्यवस्था.
दवाखाने, औषधी दुकाने,
रुग्णवाहिका.
विद्युत पुरवठा
प्रसार माध्यमे, मीडिया
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List