दहा वर्षांत 20 कोटींचा खर्च तरीही गंगा अस्वच्छच; जयराम रमेश यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दहा वर्षांत 20 कोटींचा खर्च तरीही गंगा अस्वच्छच; जयराम रमेश यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान शनिवारी 1 जून रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मात्र त्याआधी गंगा नदीच्या स्वच्छतेवरून राजकारण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गंगा स्वच्छ करू असे आश्नासन दिले होते. मात्र 10 वर्षे लोटली तरी गंगा स्वच्छ झाल्याचे दिसले नाही. उलट 10 वर्षांत 20 कोटी खर्च केला. मात्र, गंगा अस्वच्छच राहिल्याची जोरदार टीका जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे.

2014 च्या तुलनेत गंगा नदी अधिक प्रदूषित झाली आहे. पूर्वी येथील प्रदूषित क्षेत्रांची संख्या 51 होती. मात्र आता ती 66 झाली आहे. येथील पाण्यात अॅण्टिबायोटिक प्रतिरोधक बॅक्टेरिया सापडू लागले आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बिहार सरकारचा एक अहवाल समोर आला. या अहवालानुसार गंगेचे पाणी ना आंघोळीसाठी वापरण्या योग्य आणि ना शेतातील पिकांसाठी, असे जयराम रमेश म्हणाले. 2009 मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने ‘मिशन गंगा’ सुरू केले होते. मात्र नंतर त्याचे नाव बदलून ‘नमामि गंगा’ करण्यात आले. मागील केंद्र सरकारने 2009 मध्ये राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाची स्थापना केली होती. मात्र त्याचे नाव देखील बदलून राष्ट्रीय गंगा नदी परिषद, असे करण्यात आल्याचे जयराम रमेश यांनी पोस्टमध्ये म्हटले.

जयराम रमेश यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये ‘नमामि गंगा’ प्रकल्पावरूनही भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ज्या खासगी कंत्राटदाराला ठेका देण्यात आला होता, त्यांची कामगिरी निकृष्ट दर्जाची असूनही त्यांना निधी देण्यात आला, असा आरोप जयराम रमेश यांनी केला. यासोबतच या योजनेबाबत कॅगच्या अहवालात नमूद केलेल्या त्रुटींकडेही जयराम रमेश यांनी लक्ष वेधले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;