‘INDIA आघाडी 300 पार’; नाना पटोलेंचा मोठा दावा

‘INDIA आघाडी 300 पार’; नाना पटोलेंचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024: देशातील मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी पार पडणार आहे. यानंतर सगळ्यांना वेध लागतील ते निकालाचे. विविध पक्ष आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या टप्प्यांवरून अंदाज बांधत आहेत. मोदी सरकार वारंवार 400 पारची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात INDIA आघाडी 300 हून अधिक जागा जिंकत असल्याचा मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी मोठी आघाडी घेणार अशा प्रकारचे वृत्त निवडणुकांच्या आधी प्रसिद्ध झालेल्या विविध सर्व्हेतून देण्यात आलं होतं. निवडणुकांच्यादरम्यान देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. ‘राज्यात 40 हून अधिक जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार आहे. इंडिया आघाडी देशात 300 जागांहून अधिक जागा जिंकेल असं चित्र आहे’, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
‘निवडणुका ज्यावेळी सुरू झाल्या होत्या त्यावेळी आम्ही मोदींविषयी जनतेच्या मनात रोष असल्याचं सांगितलं होतं. देशाचं संविधान सुरक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचा अपमान केला आहे’, असा आरोपही त्यांनी केला आहे.

राज्या सरकारच्या धोरणांवर टिका करतानाच शेतकऱ्यांचे कसे हाल सुरू आहेत याकडे देखील त्यांनी लक्षं वेधलं. निवडणुकांच्या काळात महाराष्ट्रात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र सरकार प्रचारात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांना मदत दिली नाही याबाबत निवडणूक काळात आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांना पत्र लिहिल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलं.

पंतप्रधान मोदी यांना दिंडोरीच्या सभेत एका शेतकऱ्याने कांद्यावर बोला असं म्हणाला म्हणून त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला. म्हणजे शेतकऱ्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;