बाय बाय भाजप! गुड बाय मोदी; राहुल गांधी यांची मोठी भविष्यवाणी
लोकसभा निवडणुकीचा अखेरच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्व पक्ष प्रचारात झोकून देत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील पूर्वांचलच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी 4 जून रोजी लागणाऱ्या लोकसभा निकालांबाबत मोठी आणि महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. आता 4 जूनननंतर बाय बाय भाजप! गुड बाय मोदी असे राहुल गांधी म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी एक्सवर ट्विट केले आहे.
या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हचले आहे की, 4 जूननंतर Good Bye BJP, Good Bye नरेंद्र मोदी, Tata! आता जनतेची फसवणूक करणाऱ्या नकली फकीराकडे फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. INDIA आघाडीला मते मिळत आहेत खटाखट खटाखट! भाजपपासून देशाला मुक्ती मिळणार, खरे अच्छे दिन येणार फटाफट!,असे ट्विट करत राहुल गांधी यांनी 4 जूननंतरची भविष्यवाणी केली आहे.
4 जून के बाद Good Bye BJP, Good Bye नरेंद्र मोदी, Tata!
7 दिन बस और बचे हैं, जनता को ठगने वाले नकली फक़ीर के पास।
INDIA को वोट मिल रहे हैं – खटाखट खटाखट!
भाजपा से देश को मुक्ति मिलेगी, देश के सच्चे अच्छे दिन आने वाले हैं – फटाफट फटाफट! pic.twitter.com/uhnUkxdlwJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2024
आता इंडिया आघाडीत काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आहेत. सायकलवर पंजाची मजबूत पकड असते. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. भाजपचा सुपडा साफ होणार आहे. तर इंडिया आघाडीकडे जागांची लाईन लागणार आहे, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमध्ये 13 जागांवर मतदान होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List