नरेंद्र मोदी वरून टपकले! ‘जन्म बायोलॉजिकल नाही’ विधानाचा राहुल गांधी यांनी पुन्हा घेतला समाचार
लोकसभेसाठी मतदान करण्याचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. यानिमित्तानं उत्तर प्रदेशात सर्वच पक्षांच्या दणदणीत सभा सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील देवरिया येथे प्रचार सभेत बोलताना काँग्रेस राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या ‘माझा जन्म बायोलॉजिकल नाही’ या विधानाचा पुन्हा एकदा समाचार घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींनी आपला जन्म बायोलॉजिकल नसून परमात्म्यानं पृथ्वीवर पाठवल्याचं विधान केलं होतं. त्याविधानाचा राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, बंधू भगिनींनो नरेंद्र मोदींनी त्यांच्या मुलाखतीत आपला जन्म बायोलॉजिकल नाही, तर परमात्म्यानं आपल्याला पाठवलं आहे असं विधान केलं आहे. म्हणजे ते इतरांसारखे आईवडिलांच्या उदरातून जन्मले नाहीत तर आकाशातून टपकले आहे. त्यांना ‘त्यांच्या परमात्म्यानं’ शेतकरी, मजुर, श्रमिक यांच्या मदतीसाठी नाही तर अंबानी आणि अदानींना मदत करण्यासाठी पाठवलं आहे. पण खरंच ‘परमात्मा’ने त्यांना पाठवलं असतं तर त्याने मोदींना सांगितलं असतं की गरीब, मजुर, श्रमिकांची मदत कर. मात्र मोदींना ‘त्यांच्या परमात्मा’ने पाठवलं आहे जो त्यांना अदानी अंबानींना मदत करण्यास सांगतो. हिंदुस्थानची सगळी विमानतळं, रेल्वे, पावर प्लांट अदानी अंबानींना दे, असं त्यांच्या परमात्मा सांगतो, असा कसा त्यांचा परमात्मा आहे? असा वार राहुल गांधी यांनी केला आहे.
Deoria, Uttar Pradesh | Congress leader Rahul Gandhi speaks on PM Modi’s ‘Parmatma’ statement, he says, “…Everyone else is biological but Narendra Modi ji is not biological. He has been sent by his ‘parmatma’ to help Ambani & Adani but ‘parmatma’ has not sent him to help the… pic.twitter.com/JdAiNDzglg
— ANI (@ANI) May 28, 2024
तसेच येणाऱ्या 4 जून रोजी देशातून मोदींची सत्ता नष्ट होऊन INDIA आघाडीचं, जनतेचं राज्य येईल असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
दरम्यान. या आधी नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी सडकून टीका केली होती आणि देवापुढे हातच जोडले होते. ‘आम्ही आता देवाला प्रश्न विचारतो. अरे देवा, असा माणूस कसा रे पाठवलास? पंतप्रधान आजकाल बरळत सुटलेत. असे कोणी सामान्य माणूस बोलला तर त्याला थेट वेडय़ाच्या डॉक्टरकडे नेले जाईल’, असा जबरदस्त टोला देखील राहुल यांनी लगावला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List