SSC Result: इंग्लिशपेक्षा मराठी कठीण, 38 हजार 437 विद्यार्थी नापास

SSC Result: इंग्लिशपेक्षा मराठी कठीण, 38 हजार 437 विद्यार्थी नापास

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणावर भर दिला आहे. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या परीक्षेतच गटांगळ्या खाल्ल्या आहेत. इंग्रजी प्रथम भाषा विषयापेक्षा मराठी प्रथम भाषा विषयात नापास होणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. राज्यातील 38 हजार 437 विद्यार्थी मराठी नापास झाले आहेत. मुंबई विभागातील मराठी नापासांची संख्या 4 हजार 670 एवढी आहे. राज्यातील 6738 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आहेत.

मुंबई विभागात दहावीची परीक्षा ही 58 विषयांसाठी घेण्यात आली होती. त्यातील 21 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. यामध्ये गुजराती, द्वितीय भाषा उर्दू, हिंदी-फ्रेंच द्वितीय आणि तृतीय भाषा, हिंदी-कन्नडा, हिंदी-तामिल, हिंदी-मल्यालम, हिंदी-बेंगाली आदी जोड विषयांच्या निकालांचा समावेश आहे. यासोबत व्यावसायिक अभ्यासक्रमातील हेल्थ केअर, अॅग्रीकल्चर, डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, प्लंबर जनरल आदी विषयांचाही निकाल 100 टक्के लागला आहे.

निकाल वाढण्याची कारणे

प्रश्नांची काठिण्य पातळी कमी होती.

परीक्षा काळात पोषक वातावरण.

कोरोनानंतर अध्यापनाचा मोठा भर, अभ्यासक्रमातील त्रुटी कमी.

परीक्षेसंदर्भात कोणताही बदलाचा निर्णय नव्हता.

गणित विषयाचा निकाल 96.89 टक्के लागला आहे. 15 लाख 82 हजार 655 विद्यार्थ्यांनी गणिताची परीक्षा दिली. त्यापैकी 15 लाख 33 हजार 407 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सायन्स आणि टेक्नॉलॉजी विषयाचा निकाल गणितापेक्षा जास्त आहे. 97.03 टक्के विद्यार्थी या विषयात उत्तीर्ण झाले आहेत.

तर सोशल सायन्सचा निकाल गणित आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक असून 97.73 टक्के विद्यार्थी या विषयात उत्तीर्ण झाले आहेत.

इंग्रजी विषयाचा निकाल 98.12 टक्के लागला. 3 लाख 59 हजार 229 विद्यार्थ्यांनी इंग्रजीची परीक्षा दिली. यापैकी 3 लाख 52 हजार 491 जण उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई विभागात मराठी विषयासाठी 1 लाख 6 हजार 256 जणांनी नोंदणी केली होती. परंतु परीक्षेला प्रत्यक्षात 1 लाख 5 हजार 322 जण बसले होते. त्यापैकी 1 लाख 652 जण उत्तीर्ण झाले असून उर्वरित 4 हजार 670 जण मराठीत नापास झाले आहेत.

10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठीची परीक्षा दिली होती. त्यात 10 लाख 55 हजार 715 म्हणजे 96.49 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

हिंदी प्रथम भाषा विषयाचा राज्याचा निकाल 93.91 टक्के इतका लागला. 2381 विद्यार्थी हिंदीत नापास झाले. 39 हजार 110 विद्यार्थ्यांनी हिंदीची परीक्षा दिली त्यापैकी 36 हजार 729 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;