चारशे पारच्या घोषणेमुळे गैरसमज वाढले – प्रफुल्ल पटेल

चारशे पारच्या घोषणेमुळे गैरसमज वाढले – प्रफुल्ल पटेल

भाजपच्या अब की बार चारसो पार या घोषणेमुळे जनतेत गैरसमज वाढले आणि त्याचा सामना आम्हाला प्रचारादरम्यान करावा लागला, असे विधान अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज केले. चारशेपार जागा मिळवून भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे, असा प्रचार मोठय़ा प्रमाणात विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यामुळे जनतेत गैरसमज पसरला. लोकांना ते खरेही वाटू लागले. त्यामुळे त्या स्थितीला आम्हाला तोंड द्यावे लागले. एनडीएच्या बैठकीत मी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यावर भाजप नेतृत्वाकडून सभांमधून स्पष्टीकरण देण्यास सुरुवात करण्यात आली, असे पटेल म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आमची पारंपरिक मते दूर गेली, असे पक्षात सर्वांनाच वाटत असल्याचेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;