मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते, मतदान झाले की मराठे वाईट झाले!
मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. पण मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते आणि मतदान झाले की मराठे वाईट ठरले! हे कसे झाले? असा टोला मुंडेवाडी व्हायरल व्हिडीओवरून मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे. मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. बीड जिल्हा संतांची भूमी आहे. बीड जिल्हय़ात असे कधीही झाले नाही. मराठा समाजाने कधीही जातीय राजकारण केले नाही. उलट सर्व समाजाला सोबत घेऊनच मराठा समाजाने राजकारण केले आहे, असे जरांगे म्हणाले. पण मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते आणि मतदान संपले की मराठे वाईट झाले! हे कसे झाले? असा सवाल जरांगे यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List