मोदी ईडीला म्हणतील, देवाच्या आदेशाप्रमाणे मी केले; राहुल गांधींचा जबरदस्त टोला
पंतप्रधानांनी परमात्म्याची कहाणी रचून ती भाषणात ऐकवली. ही कहाणी निवडणुकीनंतर ईडीसाठी तयार केली आहे, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला. बिहारच्या बख्तियारपूर येथे एका प्रचारसभेत ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी एक परमात्मा सिद्धांत मांडला आहे. तुम्हाला ठाऊक आहे की ही परमात्मावाली गोष्ट का तयार करण्यात आली आहे. निवडणुकीनंतर जेव्हा ईडीचे लोक नरेंद्र मोदींना अदानीविषयी विचारतील, तेव्हा मोदी म्हणतील की त्यांना काहीही ठाऊक नाही, परमात्म्याने त्यांना सांगितलं. मोदी तुम्ही लांबलचक भाषणं देणं बंद करा. देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करू नका, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List