भाजपला इंडिया आघाडीची धास्ती; विरोधकांनी जबरदस्त टक्कर दिल्याची अमित शहा यांची कबुली

भाजपला इंडिया आघाडीची धास्ती; विरोधकांनी जबरदस्त टक्कर दिल्याची अमित शहा यांची कबुली

लोकसभा निवडणुकांच्या सहा टप्प्यातील मतदान झाले असून आता सातव्या टप्प्यातील मतदान आणि निकालाची प्रतीक्षा होत आहे. निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यानंतर इंडिया आघाडीने विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केल्यानंतर भाजपनेही विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, तो फोल ठरण्याची शक्यता आहे. 2014 प्रमाणे यंदाही मोदी लाटेमुळे भाजपचा विजय होईल, अशी आशा भाजपला होती. मात्र, मोदींची हवा आणि त्यांच्या चेहरा निवडणुकीत चाललाच नाही. त्यामुळे भाजपला पराजयाची भीती वाटत आहे.

या निवडणुकीत मोदींचा करिश्मा दिसलाच नाही. तसेच भाजपविरोधात देशातील अनेक महत्त्वाच्या पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. स्थापनेपासूनच भाजपने या इंडिया आघाडीची धास्ती घेतली होती. तसेच इंडिया आघाडीवरून जनतेची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, जनतेनेच आता भाजपला नाकारल्याचे चित्र सहाव्या टप्प्यानंतर दिसत आहे. त्यामुळे भाजपची धास्ती आणखी वाढत आहे. देशभरात विरोधकांनी भाजपला जबरदस्त टक्कर दिली, अशी कबुलीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

देशात सशक्त विरोधी पक्ष नसल्याने यंदाची लोकसभा निवडणूक सोपी जाईल, असा अंदाज भाजपला होता. मात्र, देशातील महत्त्वाच्या पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आणि भआजपला जबरदस्त टक्कर दिली. गेल्या महिन्यापासून विरोधकांची हवा असल्याचे दिसत आहे. विरोधक जोरदार लढा देत आहेत, अशी कबुली शहा यांनी दिली. आता 4 जूना लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे आता निकालाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता विरोधकांनी जबरदस्त टक्कर दिल्याची कबुली शहा यांनीच दिल्याने त्यांच्या या विधानाची चर्चा होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;