आई फिरायला गेली, परत येईल.. जान्हवी कपूरला आजही श्रीदेवींची प्रतीक्षा

आई फिरायला गेली, परत येईल.. जान्हवी कपूरला आजही श्रीदेवींची प्रतीक्षा

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. जान्हवी आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आईच्या निधनानंतर प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे आणि मी पहिल्यापेक्षा अधिक धार्मिक, काही प्रमाणात अंधविश्वासू झाली आहे, असं जान्हवीने सांगितलं. आईच्या निधनाच्या सहा वर्षांनंतर आजसुद्धा ती अचानक माझ्या आयुष्यात परत येईल असं वाटत असल्याची भावनाही जान्हवीने व्यक्त केली.

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “आधी माझा काही गोष्टींवर विश्वास नव्हता. शुक्रवारी केस धुवायचे नाहीत, रविवारी काळे कपडे घालायचे नाहीत, अशा गोष्टींवर माझा विश्वास नव्हता. मात्र आईच्या निधनानंतर मी प्रत्येक गोष्ट मानू लागले. ती गेल्यानंतर माझा दृष्टीकोन खूपच बदलला. देवाची पूजा-अर्चना यात आता माझं मन अधिक रमतं. हिंदुत्वाविषयी मी अधिक जागरूक झाली. मी पहिल्यापेक्षा जास्त धार्मिक झाली आहे. यामागे आईच कारणीभूत आहे. मला आजही वाटतं की ती कुठेतरी फिरायला गेली आहे. काही दिवसांनंतर पुन्हा घरी येईल. ती या जगात नाही, या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

“तिरुपती बालाजी यांच्याशी माझ्या आईचं एक वेगळंच कनेक्शन होतं. तिच्या निधनानंतर मी ठरवलं की तिच्या प्रत्येक वाढदिवशी मी बालाजींच्या दर्शनाला जाईन. आजही मी तिथे जाते, तेव्हा भावूक होते. माझ्या आयुष्यातील कोणतीही मोठी गोष्ट असली तरी त्यापूर्वी मी पायऱ्या चढून बालाजींचं दर्शन घेईन, असा निर्धार केला. एखादी गोष्ट मला सहजरित्या मिळाली, तर त्या लायक मी आहे, असं मला वाटत नाही. मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे. मी हे मान्य करते की इंडस्ट्रीत मला सहज संधी मिळाली, पण मला इतकी मेहनत करायची आहे की त्या संधीला मी न्याय देऊ शकेन. त्याचसोबत मला स्वत:लाही याची जाणीव करून द्यायची आहे की मी कोणा दुसऱ्याची जागा घेतली नाही. मला जे काही मिळालंय, ते माझ्या मेहनतीमुळे मिळालं आहे.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;