आंबेडकर-गांधी यांच्यातील चर्चेविषयी काय म्हणाली जान्हवी? पहिल्यांदाच मांडलं मोकळं मत

आंबेडकर-गांधी यांच्यातील चर्चेविषयी काय म्हणाली जान्हवी? पहिल्यांदाच मांडलं मोकळं मत

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी इतिहास या विषयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. इतिहासातील असा कोणता काळ तुला पुन्हा पहायला आवडेल, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर तिने सांगितलं की तिला भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्त्व करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पहायला आवडले.

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला विचारलं गेलं, “इतिहासातील असा कोणता काळ आहे, जो तुला पुन्हा पहायला आवडेल?” याचं उत्तर देताना जान्हवी म्हणाली, “मला इतिहास या विषयाची आधीपासूनच खूप आवड आहे. तुम्हाला खरंच सत्य जाणून घ्यायचं आहे का? पण मी उत्तर दिल्यावर तुम्ही त्यावरून मला प्रतिप्रश्न करू नका. कारण माझी मतं प्रेक्षकांपर्यंत कोणत्या उद्देशाने पोहोचतील, याचा अंदाज बांधता येत नाही. मला असं वाटतं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. कोणत्या मूल्यांसाठी ते लढले आणि त्यांची मतं काळानुसार कशी बदलत गेली, त्याचा लोकांवर कसा प्रभाव पडला याबद्दलची केवळ चर्चा ऐकायची आहे. या दोघांनीही आपल्या समाजाला खूप काही दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की ती चर्चा खरीच ऐकण्यासारखी असेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी पुढे म्हणाली, “सुरुवातीपासूनच आंबेडकर यांची मतं (जातीच्या बाबतीत) फार कठोर होती. तर गांधींची मतं वेळेनुसार विकसित होत गेली. आपल्या समाजातील जातीची समस्या.. एका तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्याबाबत जाणून घेणं आणि ते आयुष्य जगणं यात खूप मोठा फरत आहे.” यानंतर जान्हवीला विचारलं गेलं की तिच्या शाळेत कधी जातीच्या विषयावरून चर्चा झाली का? त्यावर तिने सांगितलं, “माझ्या शाळेत आणि घरात कधीच जात या विषयावरून चर्चा झाली नाही.”

जान्हवीच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ती ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत मुख्य भूमिका साकारतेय. शरन शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग अवघ्या 30 दिवसांत पूर्ण झालं. तर जान्हवीने तिच्या भूमिकेसाठी 150 दिवस प्रशिक्षण घेतलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;