जनतेचे प्रश्न म्हणजे राजकारण आहे काय?
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी आज एक्सवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. खासदार राहुल गांधी पुण्यातील दुर्दैवी घटनेवर बोलले तर फडणवीस म्हणतात, या घटनेचे राजकारण करणे राहुलजींना शोभत नाही. पवार साहेब महाराष्ट्रातील दुष्काळावर बोलले तर फडणवीस म्हणतात, दुष्काळाचे राजकारण करणे पवार साहेबांना शोभत नाही. अर्थात फडणवीस यांच्या मते जनतेचे प्रश्न मांडणे म्हणजे निक्वळ राजकारण करणे आहे काय? असा खरमरीत सवाल अनिल देशमुख यांनी विचारला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List