अकरावी प्रवेशअर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात

अकरावी प्रवेशअर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांसाठी अकरावी प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने केले जातात. शुक्रवारी पहिल्याच दिवशी मुंबई महानगर क्षेत्रातून 20 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशनोंदणी पूर्ण केली आहे. तर सहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्ज लॉक केले असून तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.  दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग-2 मध्ये आवडीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरता येणार आहे. विद्यार्थी एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर दोन दिवसापर्यंत प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा भाग-1 भरू शकतात. तसेच अर्जातील माहिती तपासून प्रमाणित करता येईल. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील पाच दिवस विद्यार्थ्यांना कॉलेज पसंतीक्रम (अर्ज भाग- 2) नोंदविता येतील. यादरम्यान कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रियाही सुरू राहणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;