आपची सत्ता असल्याने केंद्र सरकारने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला नाही, आदित्य ठाकरेंचा घणाघात

आपची सत्ता असल्याने केंद्र सरकारने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला नाही, आदित्य ठाकरेंचा घणाघात

दिल्लीतील सात लोकसभेच्या जागांसाठी येत्या 25 मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत केंद्रातील भाजप सरकारला फटकारले आहे.

”भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार असल्याचे वचन दिले आहे. पण त्यांना दिल्ली जिंकता आली नाही आणि तिथे पुन्हा एकदा आम आदमी पार्टीची सत्ता आल्याने केंद्र सरकारने दिल्लीच्या जनतेला दिलेले वचन पूर्ण केले नाही”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. ‘X’ या समाजमाध्यमावर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत भाजपला फटकारले.

या ट्विटमधून त्यांनी दिल्लीतील जनतेला सवाल देखील केला आहे. ”आपल्या राजकीय अहंकारासाठी दिल्लीतील जनतेला आणि दिल्लीकरांनी निवडून दिलेल्या सरकारचा छळ करणाऱ्यांना तुम्ही पुन्हा मत देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;