Lok Sabha Election 2024 : ‘इंडिया’ आघाडी किती जागा जिंकेल? दिल्लीतील मतदानाआधी अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 : ‘इंडिया’ आघाडी किती जागा जिंकेल? दिल्लीतील मतदानाआधी अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी येत्या 25 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण 58 मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये दिल्लीतील सर्व 7 लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. तसेच बिहार, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील मतदारसंघांमध्येही मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघडीला किती जागा मिळणार? याचे भाकित अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. आम आदमी पार्टी वेगाने वाढत असल्याने नरेंद्र मोदी आणि भाजप घाबरले आहेत. आमच्यावर सतत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, आम्ही सत्याच्या बाजूने उभे आहोत आणि लढत राहणार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

‘दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची लाट’

दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची लाट आहे, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. दिल्लीतील लोकसभेच्या सर्व सातही जागांवर ‘इंडिया’ आघाडीचा विजय व्हायला हवा, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे. ‘इंडिया’ आघाडीला निवडणुकीत 300 हून अधिक जागा मिळतील. आणि बहुमताने ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;