मतदानाचा रीयल टाइम डेटा आणि अंतिम आकडय़ांत 1.7 कोटींचा फरक; काँग्रेसने आकडेवारी मांडत केला सवाल
लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांत जे मतदान झाले त्याचा रीयल टाइम डेटा आणि त्यानंतर जी अंतिम आकडेवारी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एक म्हणजे अंतिम आकडेवारी जाहीर करण्यासाठी 11 ते 12 दिवसांचा उशीर का झाला आणि दुसरे म्हणजे मतदानाचा रीयल टाइम डेटा आणि अंतिम आकडेवारी यात जवळपास 380 जागांवर तब्बल 1 कोटी 7 लाखांचा फरक आहे. त्याचे कारण काय, असा सवाल करत काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पहिल्यांदाच असे घडल्यामुळे लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबद्दलच संशय निर्माण झाला आहे. हा संशय दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. संपूर्ण देशात प्रत्येक मतदाराला याबाबत चिंता वाटते. त्यामुळे आम्ही वारंवार मतदानाच्या आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित करत असल्याचे काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले. मिसिंग ईव्हीएम पुठे आहेत, असा सवालही त्यांनी विचारला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List