‘एआय’चा मानवी अस्तित्वाला धोका; जेफ्री हिंटन यांनी व्यक्त केली भीती
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हळूहळू आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनत चालले आहे. अनेक क्षेत्रांत एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. एआयचे जनक म्हणून डॉ. जेफ्री हिंटन यांनी मात्र या तंत्रज्ञानाच्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. एआयकडून मानवी अस्तित्वाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले. एआय तंत्रज्ञानामुळे अनेक लोकांना नोकऱया गमवाव्या लागतील. लोकांच्या उत्पन्नात असमानता दिसू शकते. येत्या पाच ते 20 वर्षांमध्ये एआय एक मोठे आव्हान बनू शकते. या तंत्रज्ञानासाठी मी इतकी वर्षे काम केले, याची मला आयुष्यभर खंत वाटेल, असे हिंटन म्हणाले. एआयमुळे कार्यक्षमता आणि संपत्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल, पण हा पैसा श्रीमंत लोकांकडे जाईल, असेही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List