इगतपुरीतील धरणात बुडून 5 जणांचा मृत्यू; उजनी जलाशयात बोट उलटून 6 बेपत्ता
नाशिक/इंदापूर, दि. 21 (प्रतिनिधी)
इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये 3 युवती आणि 2 युवकांचा समावेश आहे. हे सर्वजण आज दुपारी रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. सर्वजण नाशिकरोड येथील गोसावीवाडी परिसरातील राहणारे आहेत. दरम्यान, उजनी जलाशयात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत सहाजण बेपत्ता आहेत.
मृतांमध्ये अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16), हनीफ अहमद शेख (24), ईकरा दिलदार खान (14) यांचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.
वादळी वाऱयाने उजनी धरणाच्या जलाशयामध्ये प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत सहाजण बेपत्ता झाले आहेत. करमाळा तालुक्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे जात असताना ही घटना घडली. यात कुगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बचावले आहेत. त्यांनी पोहत पाण्याबाहेर येऊन ही घटना सांगितली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List