संदेशखलीतील महिलांची स्थिती पाहून दुःख झाले; भाजपने कटकारस्थान रचले
संदेशखलीतील महिलांची स्थिती पाहून प्रचंड दुःख झाले. भाजपने महिलांच्या प्रतिष्ठेशी खेळू नये. भाजपने जे कटकारस्थान रचले त्याचा आता पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बशिरहाट येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या. भाजपच्या उमेदवार रेखा पात्रा यांच्याशी पह्नवरून बोलणे झाल्याचे सांगतानाच, भाजपच्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देशातील स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. विशेषतः उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. संदेशखलीतील महिलांसोबत जे काही झाले, त्यांना ज्याप्रकारे अपमानित करण्यात आले त्याबद्दल मी माफी मागते. त्याबद्दल मी अंतःकरणापासून दुःख व्यक्त करते, असे सांगतानाच कुणीही महिलांच्या प्रतिष्ठेशी खेळू नये अशा शब्दांत दरडावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List