तेंदूपत्ता घेऊन जाणाऱया 15 मजुरांवर काळाचा घाला; पिकअप ट्रक खड्डय़ात पडून अपघात
तेंदूपत्ता गोळा करून पिकअप ट्रकमधून गावी परतणाऱया 15 मजुरांवर काळाने घातला. कावर्धा जिह्यात बहपनी गावाजवळ पिकअप ट्रक खड्डय़ात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. यात 14 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
पिकअप ट्रकमध्ये एकूण 25 मजूर होते. हा ट्रक 20 फूट खड्डय़ात पडला. या दुर्घटनेत 14 महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला, तर आठजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कावर्धाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली. या घटनेनंतर छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी याप्रकरणी शोक व्यक्त केला. ही घटना वेदनादायी आहे, असे ते म्हणाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या सहवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List