निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड जप्त
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पेंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत सुमारे 8 हजार 889 कोटींचे घबाड जप्त केले. विशेष म्हणजे, आजवर जप्त करण्यात आलेल्या रकमेत अमली पदार्थांच्या जप्तीचा वाटा सुमारे 3958 कोटी रुपये इतका आहे, अशी माहिती पेंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दिली.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सातत्याने पाठपुरावा, जिह्यांचा सातत्यपूर्ण आढावा आणि यंत्रणांच्या दक्षतेमुळे 1 मार्चपासून आतापर्यंत एवढी मोठी रक्कम जप्त केली. जेणेकरून लोकसभा निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात. पैशाचा किंवा बळाचा वापर होणार नाही, याची आम्ही काळजी घेत असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List