पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला
राज्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात उद्या, सोमवारी 13 मतदारसंघांत मतदान होत आहे. मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी संपली. मतदानाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंचवीस हजार पोलीस आणि पेंद्रीय सुरक्षा दलाच्या 36 अतिरिक्त तुकडय़ा तैनात केल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपने मोठा धसका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर उतरवण्याची वेळ भाजपवर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तब्बल 25 सभा घेतल्या व त्यांना मुंबईत रोड शो करावा लागला. महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नाना पटोले यांच्याबरोबरच अनेक पेंद्रीय नेते प्रचारात ताकदीने उतरले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रचारासाठी आले होते. ‘इंडिया’ आघाडीच्या शुक्रवारी बीकेसीवर झालेल्या अतिविराट सभेमुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List