शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच, चंद्रपुरात नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरुच चंद्रपुरातील एका तरुण शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून कीटकनाशक पिऊन मृत्युला कवटाळले. पृथ्वीराज रामा मालखेडे (वय – 43) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून ते राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज मालखेडे यांच्या मुलीचा महिन्याभरापूर्वी विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी त्यांनी बचत गटातून हातउसनवारी पैसे घेतले होते. मात्र सततची नापिकी, मुलीच्या लग्नाच्या कर्जाचा डोंगर आणि कर्ज फेडायची चिंता यामुळे व्यथित झालेल्या पृथ्वीराज यांनी कपाशीवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्यायले. याची माहिती मिळताच शेजाऱ्यापाजाऱ्यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
महिनाभरात राज्यात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काळजीवाहू सरकारला बळीराजाची काळजी नाही
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List